निसर्गातून निर्माण झालेला प्रत्येक ध्वनी ‘स्फोट-ध्वनी’ व ‘कंप-ध्वनी’ असाच निर्माण होतो हे मागच्या लेखात आपण पाहीले. ‘स्फोट-ध्वनी’ व ‘कंप-ध्वनी’ यांची तुलना केली की त्यातील गुणधर्म अनुक्रमे मराठीतील ‘व्यंजन’ व ‘स्वर’ यांच्याशी निगडीत असलेले लक्षात येतील.
क्रम
|
स्फोट-ध्वनी
|
कंप-ध्वनी
|
1
|
उर्जेचा; हवेतील अणूअणूंतून हस्तांतरीत होत झालेल्या प्रवाहाचा; मानवाला उमगलेला परिणाम म्हणजे स्फोटध्वनी होय.
|
आघातात भाग घेणार्या वस्तुला,
आघातात निर्माण झालेली
उर्जा मिळते. प्रत्येक वस्तुतील अणूअणू नेहमी कंप पावत असतात. आघातातून मिळालेल्या
अधिक उर्जेमुळे वस्तुतील अणूअणूंत जास्त कंपने निर्माण होतात. वस्तुंतील ह्या तीव्र
कंपनांमुळे त्याला लागून असलेल्या हवेत कंपने निर्माण होतात. अशा हवेतील कंपनांतून
मानवाला उमगलेला परिणाम म्हणजे कंपध्वनी होय.
|
2
|
अतीअल्प वेळ टिकतो. मानवाच्या जाणीवांना केवळ एकदाच, त्या अल्पनिमीषापुरता ऐकू येतो. मानवाला ऐकू येण्याएवढीच त्यातल्या
वेळेची अल्पावधी असते.
|
वस्तुतील कंपनांमुळे निर्माण होतो. मानवाला ऐकू येऊ शकणार्या कंपनसंख्येच्या
मर्यादेतील जर तो ध्वनी असेल तर त्याची जाणीव मानवाला होत राहते. तो बराच अधिक काळ
टिकतो.
|
3
|
स्फोटध्वनी हा दोन वस्तुतील गती फरकातून होणार्या परिणामाचा आविष्कार असतो.
त्यावेळी तेथील उपस्थितात हवेचा सहभाग निश्चितपणे असावा लागतो.
|
कंपध्वनी हा वस्तुत होणार्या आकुंचनप्रसरणाच्या परिणामाचा आविष्कार असतो. त्यावेळी
तेथे हवेची उपस्थिती आवश्यक असते.
|
4
|
स्फोटध्वनीचे उदाहरण : फुग्याचे फुटणे.
यात केवळ स्फोट-ध्वनी ऐकू येतो, ध्वनीचा स्फोट झाल्यानंतर
उरलेल्या फुग्यातील तुटलेल्या अवस्थेतील रबर /
प्लॅस्टीक यात कंपने होत नाहीत वा त्यात झालेली कंपने मानवाच्या ऐकू येणार्या
फ्रिक्वेन्सीच्या क्षमतेत बसत नाही.
|
कंपध्वनीचे उदाहरण : ट्युनिंग फोर्क (Tuning fork)
यात समजा ‘ट्युनिंग फोर्क’ आधी कुठेतरी लांब ठिकाणी आपटला की त्यावेळचा
स्फोट-ध्वनी आपल्याला ऐकू येत नाही. पण नंतर जर कंपीत होणारा ‘ट्युनिंग फोर्क’ कानाजवळ आणला तर त्यातील ‘कंप-ध्वनी’ ऐकू येतो.
|
5
|
फुग्याच्या आतील हवेचा दाब बाहेरील हवेपेक्षा जास्त असतो. फुगा फुटताना आतील
जास्त दाबाची हवा, बाहेरील कमी दाबाच्या
हवेला अचानक धडकते. ही धडक म्हणजेच आघात असतो. हवेने हवेला दिलेली ही धडक असते. यातील
निव्वळ रबराच्या आवरणातून ‘फुटण्याचा'
आवाज येतो असे म्हणणे
योग्य ठरत नाही. कारण जर फुगा फुगलेला नसताना त्या रबरावर जोरात आघात केला तर तसा ‘फुटण्याचा' आवाज निर्माण होत नाही. म्हणजेच स्फोटध्वनी हा हवेचा हवेशी
आलेल्या जोरदार संपर्कातूनही घडू शकतो.
|
फुंकणीतून हवा बाहेर सोडताना निर्माण होणारा ध्वनी हा सातत्य टिकवून आपल्याला
ऐकू येत राहतो. त्यामुळे त्यात निर्माण झालेली कंपने मानवाला जाणवतात. वेगवेगळ्या
लांबीरूंदीच्या, वेगवेगळ्या धातूच्या, वेगवेगळ्या आकाराच्या फुंकणीतून वेगवेगळे ध्वनी ऐकायला येतात.
यातील हवेचे घर्षण नियमित व हळुवार अशा विशेषणाने मांडता येते. अचानक व अल्पावधीतला
हवेतील गतीफरक यात अनुभवास येत नाही. म्हणजेच कंपध्वनी हा हवेचा हवेशी आलेल्या हळूवार
संपर्कातूनही घडू शकतो.
|
6
|
निसर्गातील ध्वनी दोन वस्तुंच्या आधातातून निर्माण होत असल्याने निर्माण
झालेल्या नैसर्गिक ध्वनीत ‘स्फोट-ध्वनी’ प्रथम साकारतो.
|
निसर्गात निर्माण झालेला कोणताही ‘कंप-ध्वनी’ आघात-ध्वनी नंतरच निर्माण
होतो, म्हणजेच ‘कंप-ध्वनी’ हा ‘स्फोट-ध्वनी’ नंतर साकारतो.
|
मानवी भाषांना ‘व्यंजन’ आणि ‘स्वर’ हे ध्वनी वापरावे लागतात. ‘व्यंजन’ या
ध्वनीची जातकुळी ‘स्फोट-ध्वनी’शी जुळते तर ‘स्वर’ या ध्वनीची जातकुळी ‘कंप-ध्वनी’शी
जुळते.
क्रम
|
व्यंजन
|
स्वर
|
1
|
‘स्फोट-ध्वनी’ क्षणभर टिकतो तसे ‘व्यंजन’ क्षणभर टिकते.
|
‘कंप-ध्वनी’ बराच वेळ टिकतो तसाच ‘स्वर’ श्चास टिकेपर्यंत उच्चारता येतो.
|
2
|
‘स्फोट-ध्वनी’ आघातातून निर्माण होतो. घंटेचा टोल हा स्फोट-ध्वनी ठरतो. तो
आघातातून निर्माण होतो. तसेच ‘व्यंजन’ हा ध्वनी ‘स्पर्श, अंतस्थ, उष्मे,
महाप्राण, घर्षण’ अशा वर्णनातून व्यक्त करता येणार्या आघातातून निर्माण होतो.
|
‘कंप-ध्वनी’ हा आघातानंतर निर्माण झालेल्या वस्तुंच्या कंपनातून निर्माण
होतो. यात आघात होत नाही. जिभेचा तालुशी वा ओठांचा ओठांशी स्पर्श न होता,
म्हणजेच तोंडातील अवयवांचा एकमेकांशी स्पर्श न होता, ‘स्वर’ निर्माण होतो.
|
निसर्गाने मानवाला भाषा दिली नाही. भाषा बनविण्याची साधने दिली आहेत. यातील
निसर्गाने मानवावर लादलेला सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे, ‘‘‘व्यंजनाचा
उच्चार स्वराशिवाय करता येत नाही’’’. पण यातून आधी ‘स्फोट-ध्वनी’ आणि नंतर ‘कंप-ध्वनी’
या निसर्ग नियमाला जणु बाधा निर्माण होते कारण मानवाला आधी स्वराचा उच्चार करून
त्यानंतर व्यंजनाच्या आघातात जिभ पोचवून व्यंजनाचा उच्चार प्रक्षेपीत करता येतो.
यात व्यंजनाचा उच्चारात गुंतलेली जिभ सोडवून व्यंजनाचा उच्चार पूर्ण झाला असे
म्हणता येत नाही. पण व्यंजनाचा उच्चार मात्र कानांना ऐकू येतो.
‘‘‘व्यंजनाचा उच्चार स्वराशिवाय करता येत नाही’’’ हा निसर्गाने घालून दिलेल्या
नियमामुळे उच्चारीत ध्वनी एककाची म्हणजेच ‘अक्षर’ या संकल्पनेची निर्मिती
मानवाच्या भाषांना स्विकारावी लागली आहे. कोणत्या प्रकारची ‘अक्षर’ निर्मिती
भाषेने स्विकारावी याचे स्वातंत्र्य निसर्गाने मानवाला दिले असल्याने काही भाषांनी
‘आधी स्वर आणि त्यानंतर व्यंजन’ अशा ध्वनीलाही ‘अक्षर’ मानले आहे. संस्कृतने अशा
ध्वनीला अक्षर मानले आहे पण मराठीने मात्र निसर्गातील स्वाभाविकतेला स्विकारून केवळ ‘व्यंजनानंतर
येणार्या स्वर’ या ध्वनीला ‘अक्षर’ मानले आहे.
या लेखातून आणि मागच्या लेखातून पुढील गोष्टींची चर्चा आपण केली, 1) निसर्गातील स्फोटध्वनी व कंपध्वनी निर्मितीचे टप्पे,
2) संस्कृत भाषेने
‘अक्षर’ निर्मितीसाठी स्विकारलेले अनैसर्गिक धोरण, 3) मराठीने ‘अक्षर’
निर्मितीसाठी स्विकारलेले पूर्णपणे नैसर्गिक ठरणारे धोरण.
‘अक्षर’ निर्मितीत संस्कृतने स्विकारलेल्या
अनैसर्गिक धोरणामुळे संस्कृतच्या त्यानंतरच्या भाषीक प्रवासात जागोजागी अडचणी
आल्या आहेत. मराठीने ‘अक्षर’ निर्मितीत स्विकारलेल्या पूर्ण नैसर्गिक धोरणामुळे
भाषांच्या जागतिकीकरणात ती सर्वसमावेशकाची भूमिका निभावण्याएवढी सक्षम ठरते. मराठीने
‘देवनागरी’ चिन्हेच वापरावीत पण स्वतःच्या लिपीचे नाव ‘मराठमोळी’ असे घोषीत करून
संस्कृतपासून फारकत घेऊन, मराठीचा मराठीसाठी मराठीपणातून मराठीपुरताच विचार करणे,
मराठीच्या अस्तित्वासाठी आणि उज्वल भवितव्यासाठी महत्त्वाचे ठरते.
कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
आपला, शुभानन
गांगल मोबाईल – 9833102727 ईमेल – gangal@gmx.com वेबसाईट - www.gangals.com
No comments:
Post a Comment