ओळख आणि कालमापन यांचा परिचय भारतीय संगीताने उत्तमपणे करून घेतलेला आहे. संगीतातील स्वरांपेक्षा सुक्ष्म स्वरूप असलेल्या नादांना 'श्रृती' म्हणतात. श्रृती ही 'नादाची ओळख' आहे व तिचा उच्चार म्हणजे सूर होय. उच्चारित सात सूरांना आपण संगीतातील सप्तस्वर म्हणतो. यातून आपल्याला 'श्रृती म्हणजे सूर नव्हे' इतपत माहिती कळते.
श्रृती सारखीच 'व्यंजन, स्वर, विराम, अक्षर' यांची
ओळख मेंदूत होते.
भारतीय परंपरेत 'गीत, वाद्य व नृत्य' या तिघांच्या
अविष्काराला 'संगीत' म्हटले जात असे. या तिन्ही ठिकाणी सूरांचा सहभाग असतो.
गीतातील उच्चारात, वाद्यांच्या नादात आणि नृत्यातील पदन्यासात व अविर्भावात, सूर
आपली भूमिका बजावत असतात.
मानवाला उमगणारे नाद अनंत असतात, पण एका नादापेक्षा
दूसरा नाद भिन्न आहे हे कळायला त्यातील वारंवारीतेत (Frequency) 'किमान फरक' असावा
लागतो. हा 'किमान फरक' दोन सूर विभक्तपणे ऐकू येण्याच्या, निसर्गाने मानवावर
लादलेल्या मर्यादांवर, अवलंबून असतो. दोन सूरांतील 'किमान फरक' किती असला तर ते
दोन सूर मानवाला विभक्त व तटस्थ जाणवतात, हे भारतीयांनी हजारो वर्षांपुर्वी शोधले.
'सा' पासून आरंभ होणार्या सप्तसूरांना 'षड्जग्राम' व 'म' पासून आरंभ होणार्या
सप्तसूरांना 'मध्यमग्राम' म्हटले जात असे. आता ज्याला आपण सप्तक म्हणून ओळखतो ते 'षड्जग्राम'
असते. भारतीय स्वरसप्तकाची सुरवात 'सा' या स्वराच्या 240 वारंवारीते (Frequency) पासून होते.
भारतीय संगीतशास्त्रावरील ग्रंथात 'संगीत रत्नाकर'
ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. श्री. श्रीनिवास व श्री. भातखंडे या दोघां संगीत
पंडीतांनी मांडलेल्या आजच्या युगातील 'स्वरसप्तक' पुढे देत आहे. यातील पहिल्या ओळी
श्रृतींची संख्या, दुसर्या ओळीत सप्तकातील सूर, तिसर्या ओळीत सूरांची वारंवारीता
(Frequency)
दिली आहे.
भारतीय संगीतातील 'स्वरसप्तक' –
1
|
2
|
3
|
4
|
5
|
6
|
7
|
8
|
9
|
10
|
11
|
12
|
13
|
14
|
15
|
16
|
17
|
18
|
19
|
20
|
21
|
22
|
|
|
|
सा
|
|
|
रे
|
|
ग
|
|
|
|
म
|
|
|
|
प
|
|
|
ध
|
|
नि
|
|
|
|
240
|
|
|
270
|
|
301 17/ 43
|
|
|
|
360
|
|
|
|
388 4/ 5
|
|
|
432
|
|
452 4/ 43
|
भाषकाला ऐकू येणारे संगीतातील सूर कोणत्या वारंवारेचे
(Frequency)
आहेत, हे जाणण्याची गरज नसते. भाषक केवळ त्या सूरांचा आस्वाद घेतो. त्याला निव्वळ
ऐकून, ते संगीत आवडते की नाही हे ठरविण्याचे स्वातंत्र्य असते. त्याने असा
संगीताचा अभ्यास करण्याची आवश्यकता नसते. पण संगीताचा अभ्यास केल्यानेच उत्तम
संगीत निर्माण होऊ शकते, तसेच 'ओळख व कालमापन' यातील माहिती याच कारणाने द्यावी
लागत आहे. आता 'नादाची ओळख' याची थोडी अधिक माहिती घेऊ.
'श्रृती' व 'सूर' यांचा संबंध
ध्वनीच्या उच्च-नीचतेशी असतो –
उच्चारीत ध्वनी 85 ते 1100 वारंवारीतेचा (Frequency) असतो. वारंवारीता म्हणजे एका सेकंदात ऐकू येणारी ध्वनीची कंपनसंख्या होय.
ऐकू आलेल्या दोन ध्वनीतल्या वारंवारीतेतला फरक आपल्याला आकडेमोडीतून सांगता व
व्यक्त करता येत नाही. मानवाच्या जाणिवांना उमगते ती दोन ध्वनीतल्या वारंवारीतेतली
(Frequency) भिन्नता होय. उदाहरण – ऐकलेला सूर किती वारंवारीतेचा (Frequency) होता त्याचा आकडा सांगता येत नाही. पण दोन सूरांमधला कोणता ध्वनी उच्च
(जास्त वारंवारीतेचा) आणि कोणता ध्वनी नीच (कमी वारंवारीतेचा) आहे हे कळू शकते.
तुलना केलल्या ध्वनीतील कोणत्याही ध्वनीच्या वारंवारीतेचा (Frequency) अंक (आकडा) सांगता येणार नाही.
'वारंवारीता' (Frequency) या भौतिक अनुभवाबाबतचा
'उच्च-नीचता' हा बौद्धिक अनुभव असतो. मानवाला संगीताचा आस्वाद घेता येतो याचे
कारण, 'मानवाला ध्वनीचा तुलनात्मक बौद्धिक अनुभव (ध्वनीतील उच्च-नीचता उमगणे) घेता
येतो' हा आहे.
मानवाला उमगणार्या ध्वनीच्या उच्च-नीचतेत एक
महत्त्वाचा गुणधर्म असतो. ध्वनीची वारंवारीता (Frequency)
दुप्पट झाली की तो मूळ-ध्वनीसारखा भासतो. म्हणजेच दोन ध्वनीतल्या उच्च-नीचतेतले
गुणोत्तर जर 1 :2 असले तर तो सूर सारखाच भासतो.
त्यामुळेच संगीतात मंद्र, मध्य व तार अशी तीन सप्तके निर्माण होतात. उच्चारीत
ध्वनीच्या 85 ते 100 वारंवारीतेच्या (Frequency) मर्यादेत ही सप्तके
बसवावी लागतात. मंद्र सप्तक 120 ते 240, मध्य सप्तक 240 ते 480 आणि तार सप्तक 280
ते 960 अशा वारंवारीतेतील (Frequency) असतात.
मानवाला ध्वनीचा उच्चार केवळ 85 ते 1100 वारंवारीतेचा
(Frequency) करता येत असला तरी, ऐकू येणारा ध्वनी 20 ते 20000 (वीस हजार) वारंवारीतेचा
(Frequency) असतो. त्यामुळे पियानोसारख्या वाद्यातून मानवाने सात सप्तके निर्माण केली
आहेत. 27.5 ते 55, 55 ते 110, 110 ते 220, 220 ते 440, 440 ते 880, 880 ते 1760,
1760 ते 3520 अशी सात सप्तके पियानोत असतात.
महाराष्ट्रात सामान्यपणे
संगीतासाठी गावोगावी पेटी व तबला वापरतात. पेटी म्हणजेच हार्मोनिअम होय. 1 मार्च 1040 साली 'ऑल
इंडीया रेडीओ'वर हार्मोनियमच्या वापरावर घातलेली बंदी चक्क 34 वर्षांनंतर म्हणजे 9
मार्च 1974 साली उठवली गेली. श्रृतींच्या अचूक ओळखीला हार्मोनियमवर वाव मिळत नाही
आणि भारतीय संगीत हे श्रृतींवर आधारीत आहे, हे यामागचे कारण होते. त्याकाळातील
पेटी आणि आजच्या काळातील पेटी यात बराच फरक आहे. पण भाषा वा संगीत या क्षेत्रात,
राजकीय पुढारी व सन्माननीय व्यक्ती आपली मते कशी लादू शकतात याचे 'हार्मोनियमला
'ऑल इंडीया रेडीओ'वर घातली गेलेली बंदी' हे ठसठशीत उदाहरण ठरते. या विषयावर बरीच
उलटसुलट चर्चा होऊ शकते आणि या लेखाचा तो विषय नाही.
सर्वसाधारणपणे 'मध्य सप्तक' यालाच स्वर-सप्तक
म्हणून ओळखले जाते कारण गायकाच्या सामान्य आवाजाला यात सहजता प्राप्त होते.
स्वर-सप्तकातील 'सा' ची वारंवारीता (Frequency) 240 असते.
मंद्र सप्तक स्थानातील बावीस श्रृतींची वारंवारीता
(Frequency) दुप्पट झाली की त्या मध्य सप्तक ठरतात. मध्य सप्तक स्थानातील बावीस
श्रृतींची वारंवारीता (Frequency) दुप्पट झाली की त्या तार सप्तक
ठरतात. यामुळेच तीन सप्तकात जरी एकूण सूर 66 (22श्रृती X 3सप्तके = 66 सूर) ठरतात. म्हणजेच
श्रृती मात्र केवळ 22 ठरतात. 'श्रृती' आणि 'सूर' यांच्यातील हा फरक ओळखला की
संगीताचा एकूण आभास, जाणिवा आणि आस्वाद घेण्यातील मार्ग सहजसोपा होतो. श्रृती केवळ
बावीस मानण्याचे हे कारण आहे.
मंद्र, मध्य व तार सप्तकातील त्या भिन्न आहेत असे
मानायचे ठरवले तर, त्या 66 पेक्षा कास्त ठरतात, कारण उच्चारातील वारंवारीतेचा (Frequency) आवाक्यात (85 ते 120 आणि 960 ते 1100 या फ्रिक्वेन्सीत) आणखी श्रृतींना
उच्चारता येणे शक्य असते.
'श्रृती या 22 असून त्या मंद्र, मध्य व तार
सप्तकातील स्थानात आवृत्त होतात', हे स्विकारले नाही तर 'सा, रे, ग, म, प, ध, नि'
या स्वरांची पुनरावृत्ती होत नाही, असे मानावे लागेल आणि सर्व 66 श्रृतींना भिन्न
नावे द्यावी लागतील. पण संगीतात आपण तिन्ही सप्तकातील श्रृतींना सारख्याच नावांनी
ओळखतो आणि त्यामुळे मानवाला 'संगीत' निर्माण करता येते.
म्हणजेच 'फ्रिक्वेन्सी रहीत ध्वनीचा असा गुणधर्म जो
तिन्ही सप्तकात अवतरतो, त्यावर मानवी संगीत आधारलेले असते', असे म्हणता येते आणि
त्याची ओळख मानवाला 'श्रृती' या नावाने करून घ्यावी लागते.
फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकांदात होणारी ध्वनी
आंदोलने होत. 'श्रृती' म्हणजे फ्रिक्वेन्सीच्या 'वेळ विरहीतपणातुन' मानवाला
उमगणारे ज्ञान होय. 'श्रृती' हा संगीताच्या ज्ञानाचा 'सुक्ष्मक' आहे आणि त्याची
मानवाला होणारी ओळख ही 'काल-विरहीत' असते.
पंचेद्रियांतून प्राप्त झालेले आणि अनुभवाच्या
भांडारात संग्रह करता येणारे जे ज्ञान असते ते 'काल-विरहीत' असते. 'लाल, हिरवा,
पिवळा' असे रंग, 'खारट, तुरट, गोड' अशा चवी, 'गुलाब, मोगरा, रातराणी' असे गंध,
'गद्यातील दोन व्यंजनातील वा स्वरातील' ऐकून उमगणारा फरक', 'गरम, गार, कोमट' असे
जाणवणारे स्पर्श, असे ज्ञान 'वेळेशी संबंध न ठेवता' आत्मसात करून स्मृतीत संग्रह
करता येते.
श्रृती ही 'नादाची ओळख' आहे व तिचा उच्चार म्हणजे
सूर होय. 'श्रृतीचा सूर' किती कालमापनातल्या लांबीचा उच्चारायचा यावर बंधन नसते.
'श्रृतीचा सूर' हा 'आलाप, तान' या स्वरूपातही येतो. कमी कालमापनातील 'श्रृतीचा
सूर' आणि 'जास.त कालमापनातील 'श्रृतीचा सूर' यांचा 'श्रृती' म्हणून कळणारा, जाणवणारा
अर्थ एकच असतो आणि केवळ हाच अर्थ आपण संगीतात वापरतो.
त्याचप्रमाणे मराठी भाषेतल्या स्वराचा उच्चार
कितीही कालमापनाचा केला तरी त्या स्वराचा, गद्यामधला अर्थ एकच असतो. मराठी भाषेत
आपण प्रत्येक स्वराचा उपयोग भिन्न कालमापनातून करतो पण तरीही त्याचा गद्यातील अर्थ
केवळ त्याच्या 'ओळखीशी' संबंधीत राहतो. अक्षरातील स्वराच्या उच्चारातील
कालमापनामुळे त्यातून बनलेल्या शब्दांचा अर्थ मराठीत बदलत नाही, हे मराटीचे मूलभूत
व उपजत धोरण आहे. संगीतातल्या श्रृतींसारखेच आणि श्रृतींप्रमाणेच, मराठीला
गद्यातील स्वराची 'ओळख व उच्चारातील कालमापन' जपता आणि भाषेतून वापरता आले आहे.
संस्कृतला 'संगीत रत्नाकर' सारख्या ग्रंथातून संगीत
क्षेत्रातील उत्तम विचारसरणी मांडता आली. त्यातून श्रृतींची अचूक ओळख कालविरहीत
असल्याचे निश्चित मांडता आले. पण संस्कृतला भाषेतील स्वराशी त्याच अनुषंगाने
कालविरहीतपणे मांडणी करता आणि भाषेतून वापरता आली नाही. 'इ' व 'ई', 'उ' व 'ऊ'
यातील नाद, आवाज, ध्वनी एकच असतो पण तरीही शब्दातील अर्थात यातील कालमापनामुळे फरक
करणे हे संस्कृतने स्विकारले आहे. संस्कृत मध्ये 'वारिणी' (प्रथमेचे द्विवचन),
'वारिणि' (प्रथमेचे बहूवचन), 'वारीणि' (सप्तमीचे एकवचन), 'वारिणी' (संबोधनाचे
बहूवचन) ठरते. म्हणजेच जर वेलांटीची (इ-स्वराची) तान घेतली तर त्या शब्दांचा
संगीतात नक्की कोणता अर्थ घ्यायचा ते संस्कृतला सांगता येईल का? असे असंख्य शब्द
संस्कृतमध्ये आहेत. त्यामुळे संगीतात भाषीक अर्थ बदलला तरी चालेल का? म्हणजेच
मानवाच्या गद्यातील स्वरांचा संबंध संगीतातल्या श्रृती प्रमाणेच केवळ ध्वनीची ओळख
याच्याशी मर्यादित ठेवणे सर्वाधिक शास्त्रीय व नैसर्गिक ठरते, हे सिद्ध होते ना?
म्हणजेच भाषा म्हणून मराठी संस्कृतपेक्षा क्षेष्ठ ठरते ना?
मराठीतील प्रत्येक स्वराचा उच्चार 'अपुरा, नियमीत व
लांबट' होतो. हे कोणीही मुद्दाम ठरवून करत नाही. उदाहरण – 'गवत' शब्द कोणीही
उच्चारला तरी 'ग' मधला 'अ' स्वर नियमीत उच्चाराचा, 'व' मधला 'अ' स्वर लांबट
उच्चाराचा आणि 'त' मधला 'अ' स्वर आखुड उच्चाराचा ठरतो. हे उच्चार मराठीत कोणी
कोणाला मुद्दाम शिकवत नाहीत. अगदी नैसर्गिकपणे सर्वांकडून हे घडते.
मराठीने गद्यातील स्वरांना उच्चारात पूर्ण
नैसर्गिकता दिलेली आहे. त्यामुळे शब्दाच्या उच्चाराची आज्ञा मेंदूतून निघाल्यावर
'मुखातील स्वरयंत्र, पडजिभ, जिभ, जबडा, ओठ, बाहेर पडणारा हवेचा ओघ' अशा
उच्चारकर्त्या अवयवांना मिळते आणि कमीतकमी वेळेत ते त्या शब्दातील अक्षरांचा
उच्चार करतात. अशा उच्चारातील व्यंजनांची व्याप्ती केवळ क्षणभरच असते. त्यात मुळीच
बदल करता येत नाही. पण मराठी अक्षरातील स्वरांचा उच्चार मात्र थोडा कमी-जास्त करता
येतो. स्वरांच्या उच्चारातील कालमापनात झालेल्या अशा फरकामुळे शब्दातील अर्थात
मुळीच फरक पडत नाही. त्यासाठीचा पुडील तक्ता पहा.
मराठीतील प्रत्येक स्वराचा
उच्चार अपुरा, नियमित व लांबट होतो.
शब्दातील अक्षरातल्या अधोरेखीत
केलेल्या स्वराचा उच्चार पुढील तक्त्यात सांगितल्याप्रमाणे आपोआप होतो. कोणी कोणाला
शिकवायला लागत नाही.
|
|||||||
स्वर
|
अपुरा उच्चार
|
नियमित उच्चार
|
लांबट उच्चार
|
स्वर
|
अपुरा उच्चार
|
नियमित उच्चार
|
लांबट उच्चार
|
अ
|
पाऊस
|
कणव
|
जवळ
|
आ
|
कपाटात
|
आमटी
|
आड
|
इ
|
इहलोक
|
इतर
|
विष
|
ई
|
ईडनिंबु
|
ईश्वर
|
ईद
|
उ
|
उपयोगी
|
उसासा
|
मुळी
|
ऊ
|
ऊठबस
|
ऊनोक्ती
|
ऊर
|
ए
|
एकजूट
|
एकूण
|
एक
|
ऐ
|
ऐटबाज
|
ऐवजी
|
ऐष
|
ओ
|
ओसरता
|
ओतीव
|
ओठ
|
औ
|
औदुंबर
|
औटकी
|
और
|
अॅ
|
अॅनाटॉमी
|
अॅटम
|
अॅड
|
ऑ
|
ऑरगन
|
ऑफर
|
ऑड
|
मराठी भाषेतल्या 12 स्वरांची केवळ 'ओळख'
गद्यातल्या शब्दातील अर्थासाठी मराठीने मोडी लिपीतून हजारो वर्षे वापरली. तेव्हा
मराठी गद्यात केवळ एक-वेलांटी व एक-उकार होता. हाच मराठीचा उपजत मूलभूत स्वभाव
ठरतो. मोडीचा त्याग करून देवनागरी चिन्हांचा स्विकार करताना या उपजत मूलभूत
स्वभावाचा स्विकार करून, एक-वेलांटी व एक-उकार हे तत्त्व गद्यासाठी स्विकारले असते
तर शुद्धलेखन नियमावलीची आवश्यकताच भासली नसती. मराठीचे स्वतंत्र, स्वावलंबी,
स्वाभिमानी, स्वाभाविक अस्तित्व जपले गेले असते. आता तरी मराठीने मराठीने मराठी
लिपीला 'मराठमोळी' नाव देऊन हे साकारले पाहीजे.
मराठीने गद्य, पद्य व संगीत यांची ओळख
सुक्ष्मतेतून भव्यतेकडे अशा रितीने करून घेतलेली असून भाषेतून तिचा तसाच
शास्त्रीयतेने स्विकार करण्यात यश प्राप्त केले आहे. त्याबाबतच्या आटोपशीर व अचूक माहितीचा
पुढील तक्ता बघा.
क्रम
|
माहिती
|
गद्य
|
पद्य
|
संगीत
|
1
|
मेंदूत
प्रस्थापीत होणारा सर्वात सुक्ष्म अंश
|
व्यंजन व स्वर
|
विरामाचे
मापन
|
नादाची ओळख
|
2
|
उच्चारातून
व्यक्त होणारा सर्वात सुक्ष्म अंश
|
अक्षर
|
लघु-गुरू
|
श्रृती
|
3
|
मेंदूत
प्रस्थापीत होणारा अर्थासाठीचा सुक्ष्म अंश
|
शब्द
|
आवर्तन
|
सारीण्या
|
4
|
संवादातील
उच्चारातून व्यक्त होणारा सुक्ष्म अंश
|
वाक्य
|
ओळ
|
राग
|
5
|
ध्वनी
गुणधर्मांचा केलेला निश्चित व नेमका वापर आणि केवळ त्याच गुणधर्माच्या ओळखीवर
अर्थ अवलंबून ठेऊन, उच्चारातून केलेला तसाच वापर.
|
जातीगुणवैशिष्ट्य
|
जातीगुणवैशिष्ट्य
+ कालमापन
|
जातीगुणवैशिष्ट्य
+ कालमापन + उच्च-नीचता
|
संस्कृतला गद्य, पद्य व संगीत यातील शास्त्रीयता
भाषेच्या अनुषंगाने जपता आली नाही. मराठीने मात्र 'गद्य, पद्य व संगीत' या तिन्ही
विभागात सुक्ष्मतेतून भव्यतेकडे अशी झेप पुर्ण केली आहे. त्यामुळेच भाषांच्या
जागतिकीकरणात केवळ मराठी भाषा सर्वसमावेशकाची भश्रमिका निभावू शकेल. आजवर
बदकांच्या कळपात वावरणार्या मराठी राजहंसाने मोठे होत स्वतःचे डौलदार रूप सादर
करावे, कावळ्याच्या घरट्यात ढकललेल्या मराठी कोकीळेने आता स्वतःच्या पंखाने
स्वतंत्र, स्वावलंबी, स्वाभिमानी बनावे.
आपणास काय वाटते?
जागतिक मराठी
दिनापासून मराठीने स्वतःच्या लिपीला 'मराठमोळी' नाव घ्यावे, असे तुम्हाला वाटते
का? प्रत्येक मराठी भाषकाला याबाबत
स्वतःचे मत नोंदवण्याचा अधिकार आहे. आपला विचार जरूर
कळवा.
‘युनिकोड ते साऊंडकोड’ याबाबतचे
लेख http://soundcode.blogspot.in/ या ब्लॉगवर वाचा. कृपया ‘सर्वसमावेशक मराठी’ या
फेसबुकच्या https://www.facebook.com/groups/togangal/ ग्रुपवर मराठीच्या सर्वांगीण
विकासात विविधतेने सहभाग घेण्यासाठी सामिल व्हा.
No comments:
Post a Comment