बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

बोली व पुस्तकी मराठी एकत्र आणणारे संशोधन

Wednesday, 2 April 2014

युनिकोड ते साऊंडकोड – लेख 41 – अमृताच्या पैजा जींकणारी मराठी भाषा म्हणजे नक्की काय?



युनिकोड ते साऊंडकोड लेख 41अमृताच्या पैजा जींकणारी मराठी भाषा म्हणजे नक्की काय?

(नावे सोडुन लेखनात एक-वेलांटी एक-उकार वापरले आहेत, म्हणजेच शुद्धलेखन-नीयमावली झीडकारली आहे)

मराठीच्या दैदीप्यमान अद्वितीय नैसर्गिक शास्त्रीयतेबाबत सगळेच आहेत उदासीन !
पुढील मजकुर वाचण्यापुर्वी जवळ ठेवा, चार कीलो क्रोसीन, पाच कीलो अॅनासीन ! !

1.         मानवाच्या भाषांची प्रगती ही मानवाला अवगत झालेल्या भाषा-माध्यमांनुसार घडली.
2.         भाषा माध्यमांची प्रगती आणी मानवाची प्रगती हे एकमेकांना पुरक वीषय आहेत.
3.         साडेतीन हजार वर्षांपुर्वी नीबीड अरण्यांच्या काळात मानवाला भाषेसाठी केवळ ध्वनी हे माध्यम अवगत होते.
4.         त्यावेळी ध्वनीतील जास्तीतजास्त गुणधर्मांचा वापर करुन भारताने संस्कृत भाषा बनवली.
5.         निव्वळ, केवळ, फक्त ध्वनी हेच माध्यम भाषेला अवगत असताना त्यात भाषेच्या उच्चारातुन गद्य, पद्य व संगीत यांच्यातील भीन्नता कळणे, जपणे, वापरणे हे घडत होते का?
6.         सामान्य भाषेतुन व्यवहार साधणे म्हणजे गद्य असे मानले जात असेल का?
7.         'ज्ञान' या नावाने संग्रह करत, गुरुने शिष्याला सांगण्यासाठी, पुढील पीढीला पाठ करुन, जतन करता येइल, अशा रचना म्हणजे काव्य ठरत होते का?
8.         या लयतालवीचारांत घोळलेल्या भाषेतील रचनांना पाठ करणे सोपे पडत असेल का?
9.         प्रत्येक मानवाला संगीत उमगते पण गाता येतेच असे नाही, हा नीयम त्यावेळच्या मानवांनाही लागु पडत असेल का?
10.      जर तसे असेल तर घोकंपट्टी करुन 'ज्ञान' स्मृतीत साठवण्यासाठी 'पद्य' स्वरुपाच्या भाषा-अवीर्भावाचा वापर करुन ते साठवण्याची गरज मानवाला भासली असेल का?
11.      ज्या काळात भाषेला 'कागद' नावाचे माध्यम उपलब्ध नव्हते, केवळ 'ध्वनी' हेच भाषा-माध्यम होते, तेव्हा त्या समाजाला 'केवळ ध्वनीतुन भाषेच्या वावरण्यातील मर्यादा' लक्षात आल्या असतील का?
12.      की ध्वनी माध्यमातील जास्तीतजास्त शक्यता भाषेत वापरता आल्याच्या आनंदात वीकासाच्या दीशा खुंटल्या गेल्या असतील?
13.      साडेतीन हजार वर्षांपुर्वी नीबीड अरण्यांच्या काळात केवळ ध्वनी हेच भाषा-माध्यम अवगत असताना भारतात संस्कृत भाषेने वेद-उपनिषदे घडवली.
14.      पण त्यानंतरचे सर्व शोध भारतात नव्हे तर युरोपात लागले, का बरे असे घडले?
15.      भारतातील बुद्धी कोमात गेली होती? भारतीय भाषा निष्क्रीय बनल्या होत्या? की आणखी काही कारणे?
16.      म्हणजे भाषा उत्कृष्ठ असणे याचबरोबर ती ओघवती असणे हे यासाठी कीती महत्त्वाचे ठरते?
17.      बुद्धीला अधीक चालना मीळुन नवनवीन शोध भाषेतुन येण्यासाठी भाषा ओघवती असणे गरजेचे ठरते का?
18.      संस्कृत व मराठी यात कोणती भाषा मुक्तपणे ओघवती व कोणती कुपमंडीत ठरते?
19.      संस्कृत भाषेचा मानसीक पांगुळगाडा घेतल्याने व 'सर्व ज्ञान वेदात आहे' अशा घोषवाक्याने, नव्या नव्या संशोधनाची आबाळ भारतात झाली असण्याची शक्यता कीती?
20.      भाषेतल्या तृटींचा परीणाम बुद्धीला वेसण घालतो की नाही?
21.      नव्या संशोधनाला जन्म देण्याचे कार्य भाषेच्या शास्त्रशुद्धतेवर अवलंबुन असते का?
22.      तृटी असलेल्या भाषेतुन होणार्‍या संशोधनांची झेप कोणत्या कुंपणापर्यंत पोचेल?
23.      भाषेची माध्यमे यात 'ध्वनी व उच्चार', 'कागद व चीन्हे', 'संगणक व फॉण्ट' अशी संयुगे असतात.
24.      भाषेच्या 'उपलब्धमाध्यमा'ला 'ध्वनी-कागद-संगणक' याऐवजी आधुनीक काळात 'उच्चार-चीन्हे-फॉण्ट' असे म्हणता येते.
25.      भाषेची 'उपलब्ध-माध्यमे' ही बुद्धीतुन अवगत होणार्‍या विचार-भावनांची नीव्वळ वहाने ठरतात.
26.      जर भाषेच्या 'उपलब्ध-माध्यमां'ची सवय लावुन आपण प्रस्थापीत चाकोरीतुनच वाटचाल करत राहीलो तर बुद्धीला त्यांची झापडे लावल्यासारखी ठरतात का?
27.      बुद्धीला काय हवे आहे त्यासाठी भाषेच्या 'उपलब्ध-माध्यमां'चा कसा, कोणता, कुठे व कीती उपयोग करायचा हे ठरवता आले तर प्रस्थापीत चाकोरी-बद्धपणातील दोष लक्षात येतील का?
28.      नाहीतर त्याच दोषांच्या प्रवाहात आपण आजन्म वहात राहतो व आयुष्य भाषांतील चुकांच्या कुबड्या घेतच संपवतो, असे घडते का?
29.      अंदाजे पंचवीस वर्षांपुर्वी मी 'भाषेची ध्वनी-वृत्ती', 'भाषेची कागदी-वृत्ती' आणी 'भाषेची संगणकीय वृत्ती' असे तीन वीषय नीर्माण केले.
30.      ध्वनी-वृत्ती ही भाषेच्या उच्चारातुन, कागदी-वृत्ती ही भाषेतील चीन्हांतुन आणी संगणकीय-वृत्ती ही भाषेच्या फॉण्ट मधुन परीवर्तीत होते.
31.      'चीन्हे व फॉण्ट' यातुन भाषेतल्या उच्चारांची योग्यता पुर्णपणे पाळली जात नसल्याने भाषेच्या गळ्यात जणु लोढणे घातल्यासारखे होते.
32.      मानवी भाषांसाठीचा भाषा-जागतीकीकरणाचा अभ्यास येथुन सुरु होतो असे मला वाटते.
33.      त्यातुन अनेक भाषांबाबतचा नव्याने प्रत्यय, परीचय, साक्षात्कार झाल्याचा अनुभव येतो.
34.      जसे फिजीक्सला अणु-रेणु ही सुक्ष्मतम अंश गवसले व मानवाने प्रगतीची शीखरे गाठली तसेच ध्वनीतील नैसर्गिक ठरणारे भाषा अणु-रेणु असतात का?
35.      भाषेत वापरल्या जाणार्‍या सुक्ष्म-ध्वनीची ओळख व्याख्यात्मकपणे अणु-रेणु अशी करणे कोणत्या भाषेला शक्य आहे?
36.      जमीन, पाणी व आकाश ही प्रवासाची माध्यमे आहेत तशीच ध्वनी, कागद व संगणक ही अत्याधुनीक भाषा माध्यमे ठरतात.
37.      तृटी असलेल्या भाषेतुन बुद्धीला करता येणारा प्रवास आणी शास्त्रीय-नैसर्गिक असलेल्या भाषेतुन बुद्धीला करता येणारा प्रवास यात 'बैलगाडी' ते 'जेट' असा फरक असतो का?
38.      संगणकाच्या युगात इंग्रजी-भाषा कोणत्या क्षीतीजापर्यंत झेप घेउ शकेल?
39.      संगणकाच्या युगात इंग्रजी भाषा मानवाच्या वीकासाला मर्यादा घालत आहे, असे वाटते का?
40.      आता यापुढे जगावर राज्य करणे हे शस्त्रे-अस्त्रे करणार नसुन भाषा करणार आहे, असे तुम्हाला वाटते का?
41.      मराठी भाषेतला उपजत मुलभुत शास्त्रीय व नैसर्गिक पणाला मराठी भाषा वापरत असलेल्या देवनागरी चीन्हांमुळे कोणत्या मर्यादा पडत आहेत?
42.      भाषांच्या जागतीकीकरणात मराठी भा सर्वसमावेशकाची भुमीका नीभावु शकेल का?
43.      त्यासाठी आजच्या मायमराठीच्या देवनागरी अक्षर-चीन्हांमध्ये कोणता बदल आवश्यक आहे व का?

संशोधनातुन पुर्ण केलेल्या वीचारांना शब्दांकन देत काही मजकुर, फेसबुकवरील मर्यादा लक्षात घेऊन, पोस्ट करत आहे.

या लेखातील वीचारांना अंक दीले आहेत. त्यामुळे कोणत्या मुद्यावर चर्चा करायची आहे ते सांगता येइल.

ज्यांना याबाबत अधीक माहीती हवी असेल त्यांनी जरुर मोबाइलवर संपर्क साधावा.


मराठीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र कार्य करण्यासाठी फेसबुकच्या ग्रुपवर सामिल व्हा.






आपला, शुभानन गांगल

मोबाइल 9833102727   इमेल Shubhanan.gangal@gmx.com   वेबसाइट - www.gangals.com

No comments:

Post a Comment